Monday, October 10, 2011

जरी म्हणालो सुखात आहे..



जरी म्हणालो सुखात आहे, तरी वेदनेस काय सांगू
मनात माझ्या कितीक जपल्या, नवीन जखमेस काय सांगू


नकोच होती सहानुभूती मला जगाची उधार म्हणुनी
झुगारले मी तरी पाहती, खजील नजरेस काय सांगू?


इथेच होता मला लाभला निवांत वेळी कधी निवारा
पोखरलेल्या अवशेषांच्या सुन्या शांततेस काय सांगू ?


बंध रेशमी जपण्यासाठी झटलो होतो मीच नेहमी
निर्विकारतेने तू धागे कसे तोडलेस काय सांगू?


उगाच खोटा करुन चेहरा मला हासणे जमतच नाही
खोड जित्याची ना सरणारी, अश्या उणीवेस काय सांगू?


....रसप....
१० ऑक्टोबर २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...