Tuesday, April 07, 2009

अंगूर (चित्रपट कविता)




घोळात घोळ झाला
बट्ट्याबोळ झाला
सरळ साध्या आयुष्यात
केव्हढा गोंधळ झाला

कुणास काही कळण्या आधी
गडबड झाली सारी
पडल्या होत्या बुचकळ्यात
मोठ्या मोठ्या स्वारी

देवाच्या करणीलाही
काही तोड नाही
जोड्या सुद्धा अश्या ज्यांना
काहीच विजोड नाही!!

ह्याच्या जागी तो
आणि त्याच्याजागी हा
सज्जन होते सारे तरी
कसे फसले पाहा


सरतेशेवटी नशीबानेच
सोडवला तो गुंता
एकमेकासमोर आणली
गोंधळलेली जनता

चूक भूल देऊ घेऊ
हसण्यावारी नेऊ
भले-बुरे विसरून जाऊ
म्हणती जुळे भाऊ

....रसप....
०७ एप्रिल २००९

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...