Wednesday, July 05, 2017

एक कविता अर्धवट होती

भाळलो पण थांबलो नाही
मुंबईला समजलो नाही

एक कविता अर्धवट होती
रात्रभर मी झोपलो नाही

शांत हो तू, मग पुन्हा बोलू
मी पुरेसा भांडलो नाही

जागतो आहेच म्हणजे, मी
खूप काही प्यायलो नाही

ती मनापासून आवडली
पण तिला मी भावलो नाही

पाठ दुखते फार कारण की
आजवर मी वाकलो नाही

ती कधी कवितेत ना आली
आणि मी गझलाळलो नाही

....रसप....
५ जुलै २०१७

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...