Tuesday, January 13, 2015

रंगमंचाला न ठाउक बदलले पडदे किती

रंगमंचाला न ठाउक बदलले पडदे किती
तेच ते नेपथ्य तरिही हासले, रडले किती

वेदना, दु:खे, व्यथांचे साठले खजिने किती
आसवांवर पौरुषाची ठोकली कुलुपे किती

वाटते पाहून ओंजळ पूर्ण भरुनी सांडता
ह्यातले माझे किती अन् त्यातले माझे किती ?

जग मनापासून तू विज्ञान आणिक धर्मही..
बघ कुणीही सांगते का 'राहिली मिनिटे किती' ?

पाहिला जेव्हा जनाज़ा हात तेव्हा जोडले
एक क्षण माणूस झालो, एरव्ही जमले किती ?

एक माझ्या आत्महत्येने तुम्ही हेलावता
गाडली आहेत वाफ्यातून मी प्रेते किती !

....रसप....
६ जानेवारी २०१५

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...