Thursday, February 24, 2011

किती काळ गेला

.

"मराठी कविता" समुहाच्या "प्रसंगावरून गीत" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली रचना॥

कसा आज माझा ठोका चुकावा
किती काळ गेला तरी का स्मरावा?

तुला ना कळावी वेदना मनाची
तुटे आत काही खुपते तळाशी
नको व्यक्त काही होते कराया
किती काळ गेला….

विनवले मनाला विसरून जा रे
जुने मैत्रबंध नको ते जपू रे
तरी आसवांना वाहिले मी वाया
किती काळ गेला….

पुन्हा आजमावे तोडलेले नाते,
पुन्हा का मनाला तीच ओढ लागे ,
जुन्या मैत्रभावा पुन्हा श्वास द्यावा,
किती काळ गेला….

....रसप....
२४ फेब्रुवारी २०११

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...